
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महसुली तूट कमी करण्यासाठी आणि महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या वर्षी ८,३०० नवीन बसेस दाखल करणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मार्चपासून नवीन बसेसचे टप्प्याटप्प्याने आगमन होणार आहे. ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष असलेले सरनाईक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सध्याची १ कोटी ते १.५ कोटी रुपयांची दैनंदिन महसुली तूट दूर करण्यासाठी बसच्या कमतरतेचा मुख्य अडथळा दूर केला जात आहे. बसेस वाढल्यास प्रवासी वाढतील, ज्यामुळे उत्पन्नात आपोआप वाढ होईल, असे त्यांनी निवेदनात म्हटल्याचे सांगण्यात आले. कोरोनापूर्वी एसटीकडे सुमारे १९ हजार बस होत्या. महामारी व संपामुळे ही संख्या आता १२,६०० पर्यंत कमी झाली होती. एसटीचे दररोज ५० लाख प्रवासी…खर्च ३५ कोटी, उत्पन्न ३३ कोटी रुपयांवर एसटीच्या नफ्यासाठी निर्णय एसटी नफा कमावणारा उद्योग नाही, ती सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. किमान नुकसान टाळण्यासाठी खर्च व उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. नवीन बसेस दाखल झाल्यामुळे नक्कीच उत्पन्नात वाढ होईल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. या वर्षाच्या अखेरीस एसटी आर्थिक संकटातून बाहेर येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री पहिल्या टप्प्यात ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बस