०८ डिसेंबर २०२२
सीमाप्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर आपली चर्चा झाली आहे. पण सीमाप्रश्नाच्या संदर्भात कर्नाटकच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले. सीमा भागात शांतता कायम राखली गेली पाहिजे ही दोन्ही राज्यांची भूमिका आहे. त्यावर कर्नाटक सरकारही ठाम आहे. सीमा भागात दोन्ही राज्यांमधील नागरिकांमध्ये चांगले संबंध कायम असून ते यापुढेही कायम राहावेत. आम्ही आमची न्याय कायदेशीर बाजू न्यायालयात मांडू, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news