२४ डिसेंबर २०२२
भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
पंढरपूरमध्ये बोलत असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलही भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान भाजपला त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत असं म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली आहे.
Your email address will not be published.

Article Tags:
news