०३ डिसेंबर २०२२
भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशात पोहोचला आहे. या मालिकेची सुरुवात रविवारपासून होत आहे. मात्र, या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारतीय संघातील महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा या मालिकेतून बाहेर झाला आहे. हाताला दुखापत झाल्यानं तो या मालिकेतून बाहेर गेला आहे.
बीसीसीआयने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये शमीच्या जागी उमरान मलिक याला संधी देण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यात मलिक कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यूझिलंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय मालिका आणि कसोटी खेळणार आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news