०१ डिसेंबर २०२२
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एकापाठोपाठ एक आक्षेपार्ह विधाने येत आहेत. त्यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत म्हणाले, आमचे ४० खोके गेले असले तरी शिवसेना जागेवरच आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला असून आता उद्धव ठाकरे दौरा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत असलेल्या अवमानाबद्दल संजय राऊत म्हणाले की, छत्रपतींचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. या लोकांना आता करारा जवाब मिलेगा. राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही काल छत्रपतींचा अवमान केला. परराज्यातून आणि परदेशातून ज्या छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी लोक येतात त्याच खात्याच्या मंत्र्यांना महाराजांचा इतिसाह माहिती नसणं दुर्दैवी आहे. सध्या महाराजांचा अपमान करण्याची जणू स्पर्धा सुरुय. छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून बक्षिस ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न उपस्थित केला.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news