३० नोव्हेंबर २०२२
गोवर झालेल्या बालकांच्या विलगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. लसिकरणाच्या बाबतीत जनजागृती करणं सुरू आहे. तपासणी टीम कार्यरत आहेत. गोवर आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. वाडाळ्यात ४ महिन्याच्या चिमुकल्याचा लस दिल्यानंतरही मृत्यू झाला आहे. मुंबईत आता गोवर बाधित रुग्णांची संख्या ३०८ वरती गेली आहे. गोवर विरोधात काम करण्यासाठी यंत्रणा तयार असल्याचंही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. गोवर बाधित बालकांना ७ दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी ८०० पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news